Friday, March 23, 2012

ऋतू

उन्हातील शांतता अलुभावायची असते
त्यातील दाह सहन करायचा असतो
पण डोक मात्र शांत ठेवायचं असत

पावसातील पाण्यात भिजायचं असत
कडक उन्हातले मृगजळ मात्र
कधीच विसरायचं नसत

हिवाळ्यात उब शोधायची असते
पण शेकोटीजवळ बसताना
उन्हाळ्याची आठवण ठेवायची असते




                   रुपाली गणेश आगवणे